येत्या 15 दिवसात उर्वरित पीक विमा मिळणार | शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार...!
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. तर आजच्या MH 12 या ब्लॉग वर आपण पिक विमा संदर्भात अधिक माहिती घेऊ...
![]() |
येत्या 15 दिवसात उर्वरित पीक विमा मिळणार | शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार...! |
ही बातमी पीक विमा योजनेंतर्गत असून रखडलेली पिक विमा भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. खरिप हंगामातील २०२४ मधील ४०० कोटी रुपये आणि रब्बी हंगामातील २०२४-२५ मधील २०७ कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे. पिक विम्याची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा दिवसात जमा होईल असे कृषिमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
![]() |
येत्या 15 दिवसात उर्वरित पीक विमा मिळणार | शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार...! |
👉राज्य सरकार यांचा विमा हप्त्याचा रखडलेला वाटा :
राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा विमा रक्कम देणे इतके दिवस टाळले होते.सरकारचा वतीने हप्ता वेळेवर न दिल्यामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई देण्यास उशीर केला आहे. खरिप २०२४ साठी ४०० कोटी रुपये आणि रब्बी २०२४-२५ साठी २०७ कोटी रुपयांची रक्कम रखडली आहे. याआधी २०२०-२१ पासूनच्या भरपाईचा प्रश्न सोडवला होता, मात्र अलीकडच्या हंगामातील नुकसान भरपाईसाठी अजून प्रतीक्षा सुरू आहे.
👉पिक विमा मिळण्यास प्रतीक्षा करावा लागणार :
पीक विमा मंजूर झाल्यानंतर १० दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्याचा नियम आहे. परंतु, अनेकदा विमा कंपन्यांनी आणि राज्य शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारचा हिस्सा वेळेवर न मिळाल्यामुळे विमा कंपन्या भरपाई थांबवतात . त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते.म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.
यंदा खरिप हंगाम २०२४ मध्ये झालेल्या नुकसानाच्या भरपाईत काढणी पश्चात नुकसान भरपाई, पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई तसेच इतर दोन ट्रीगरमधील भरपाईचा समावेश आहे. मात्र, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ही रक्कम मिळण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागत आहे.
शेतकऱ्यांच्या समस्या :
कधी पावसाची कमतरता तर कधी नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट अशा अनेक संकटांमुळे पीक नुकसान होत असते आणि विमा योजनेचा मुख्य उद्देश अशा संकटावेळी शेतकऱ्यांना मदत करणे हाच आहे. पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप चांगली आहे, पण जर पैसे वेळेवर मिळाले नाहीत, तर त्याचा उपयोग होत नाही. मात्र, रखडलेली भरपाई शेतकऱ्यांच्या दैनंदिन जगण्यात अडथळा निर्माण करते.
विधिमंडळात चर्चेचा मुद्दा :
पीक विम्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चेचा विषय ठरला आहे. शेतकरी, विरोधी पक्ष, आणि कृषी हितासाठी कार्यरत असलेले अनेक गट यांनी सरकारकडे तातडीने भरपाई देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सरकारने लवकरच निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी सर्वांची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांची प्रतिक्षा आणि अपेक्षा
सध्याची परिस्थिती पाहता अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. खरिप आणि रब्बी हंगामातील नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे कर्जाची चक्रे सुरू झाली आहेत. शेतकऱ्यांची खरीपाच्या नवीन हंगामासाठी लागणारी खते , बी -बियाणे, औषधे आणि फवारणी करण्यासाठी तसेच मजुरी आणि शेतात राब यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. अशा वेळी विमा भरपाईचा उशीर शेतकऱ्यांच्या समस्या वाढवतो.
शेतकरी वर्गाला विमा भरपाई वेळेत मिळावी यासाठी एक सुस्पष्ट आणि कार्यक्षम यंत्रणा आवश्यक आहे. विमा कंपन्यांनी आणि शासनाने आपापली जबाबदारी पार पाडून शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेणे गरजेचे आहे.
नवीन शेतकरी धोरणाची गरज :
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नवे धोरण तयार करण्याची गरज आहे. विमा भरपाईसाठी एक निश्चित कालमर्यादा ठरवून ती काटेकोरपणे पाळली गेली पाहिजे. यासोबतच विमा कंपन्यांवर देखरेख ठेवणारी स्वतंत्र यंत्रणा उभारली पाहिजे.
शेती हा आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे. शेतकऱ्यांच्या कष्टावर आपण सारे अवलंबून आहोत. त्यामुळे त्यांच्या अडचणींना गांभीर्याने घेणे ही प्रत्येक सरकारची जबाबदारी आहे. पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे, पण तो वेळेत पोहोचल्याशिवाय त्याचा खरा फायदा होत नाही. त्यामुळे सरकारने वचनबद्धतेने यावर तातडीने कार्यवाही करावी.
Related posts: पी एम किसान 20 वा हप्ता या दिवशी भेटण्याची शक्यता । PM Kisan Samman Nidhi Yojana 20th Installment Release Date
शेतकऱ्यांना विमा भरपाई वेळेत मिळावी ही काळाची गरज आहे. येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात रखडलेली रक्कम जमा होईल अशी आशा आहे. शेतकरी हा देशाचा कणा असून त्याच्या कष्टाचे चीज व्हावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे..
إرسال تعليق