मराठी माणूस आरोपी असला तरी पोलिस पाठीशी घालतात-तनुश्री दत्ताचं गंभीर आरोप
अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद हा काही नवीन विषय नाही.खूप दिवसापासून आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत, पण काल पुन्हा एकदा अभिनेत्री तनुश्री दत्ता मराठी सुपर स्टार नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहे .
#Me too हॅशटॅग सुरु करणाऱ्या तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काल (२२ जुलै) तिने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ शेअर करून तिने आपल्यावर ओढवलेल्या त्रासदायक अनुभवांबद्दल सांगितले. या व्हिडीओत तनुश्रीने नाना पाटेकर, महाराष्ट्र प्रशासन आणि पोलिसांवरही आरोप केले आहे . मराठी असल्यामुळे नानांना संरक्षण दिलं जातं आणि योग्य कारवाई करत नाही . तिने दावा केला की तिच्या कामात अडथळे आणले गेले,तिचे सिनेमे बंद केले गेले आणि तिच्या विरोधातअनेक कट रचले गेले आहेत .तिच्या मते,महाराष्ट्रातजर मराठी माणूस गुन्हेगार असला तर त्याला पोलिस आणि मंत्री त्याला पाठीशी घालतात.
ABP माझा ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री दत्ताने सांगितले की, “कालच्या व्हिडीओत गेल्या ४ -५ वर्षांचा साठलेला राग बाहेर आला. या काळात मला खूप त्रास सहन करावा लागला. तिने आरोप केला की, गुंडांकडून तिचा पाठलाग झाला, त्रास दिला गेला. २०२० पासून तिचे अनेक सिनेमे जाणीवपूर्वक थांबवले गेले. इमेल्स हॅक करून तिचं काम बंद पाडण्यात आलं. तनुश्रीने म्हटले की, एक गट तिच्या विरोधात सक्रिय आहे, तो तिचं सर्व काम बिघडवतो आणि लोकांच्या मनात तिच्याबद्दल नकारात्मक विचार निर्माण करून तिला एकटं पाडतो.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने गंभीर आरोप करत सांगितले की, २०२० मध्ये तिच्या अन्नात औषध मिसळून तिला आजारी पाडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे ती उज्जैनला गेली, मात्र तिथेही तिच्या रिक्षाचे ब्रेक फेल करून तिचा अपघात घडवून आणल्याचा आरोप तिने केला. तिच्या मते, कोणी तरी सातत्याने तिचा पाठलाग करत होते आणि तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून जाणून बुजून तिला टार्गेट करत आहे. यानंतर घरातही अज्ञात लोक येऊन जेवणात काहीतरी मिसळत असल्याचा धक्कादायक अनुभव तिने शेअर केला.
इतर पोस्ट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
युट्युबर आशिष चंचलानी स्वीडिश अभिनेत्रींसोबत । हार्दिक पंड्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत युट्युबर आशिष चंचलानी, फोटो शेअर करत म्हणाला...
“सुशांतसिंह राजपूतसोबत जे घडलं,अगदी तसेच माझ्यासोबत घडतंय. फरक फक्त एवढाच की मी अजूनही जिवंत आहे,” असं तिने म्हटलं. तिने सुशांतच्या प्रकरणाचा अभ्यास केल्यामुळे आपला जीव वाचला, असं सांगत आणखी एका मुलीला अशाच प्रकारे त्रास देण्यात आल्याचा उल्लेखही केला. या सगळ्यापासून दूर राहण्यासाठी तिने भगवद्गीतेतील कृष्णाचा संदेश पाळला. ती म्हणाली, “मी कृष्ण भक्त आहे. आजूबाजूला महाभारत सुरू असलं, तरी मला सरळ मार्गानेच चालायचं आहे.
إرسال تعليق